कालच्या दहशतवादी कृत्यांनी तरी झोपलेल्या सरकारला जाग येणार आहे काय? किती दिवस हे सहन करायचं? भारताकडे गुप्तहेर खाते आहे काय? आणि असेल तर त्यांना आतापर्यंत एकही दहशतवादी कारवाई रोखता का आली नाहीये? अजून किती बळी जाण्याची वाट बघणार आहोत आपण? ११ सप्टेंबर २००१ नंतर अमेरीकेत एकही दहशतवादी कारवाई झालेली नाही. परंतु या सात वर्षत भारतात किती दहशतवादी कारवाया झाल्या आहेत? भारतीयांच्या जीवाला काही मोल आहे कि नाही?
आता लोकांना स्वस्थ बसून चालणार नाही. सरकार जागं होत नसेल तर त्यांना खडबडून जागं करावं लागेल. निवडणूका काही महिन्यांवर आल्या आहेत. दहशतवादावर काय उपाययोजना करणार हे आपण राजकीय पक्षांना विचारलं पाहिजे. ज्या पक्षांची सरकारे (केंद्रात आणि महाराष्ट्रात) ती उलथवून टाकली पाहीजेत. गेल्या काही वर्षतील घटना पाहता माझ्या सरकारकडे पुढील मागण्या आहेत:
१) राष्ट्रीय पातळीवर दहशतवादविरोधी खास सरकारी विभाग उभारणे.
२) गुप्तहेर खाते (जे भारतात अस्तित्वात नाही असे मी मानतो) अस्तित्वात आणणे.
३) पोलिसांना अद्ययावयत शस्त्रास्त्रे आणि दहशतवाद विरोधी प्रशिक्षण देणे.
४) महत्वाच्या सार्वजानिक ठिकाणी कॅमेरे लावणे.
५) संशयास्पद हालचालीची माहीती देण्याकरता २४ तास चालू असलेली राष्ट्रीय हॅाटलाईन चालू करणे.
अजूनही वेळ गेलेली नाही. भारत आर्थिक महासत्ता होण्याला दहशतवाद हा मोठा धोका आहे तो आपण वेळीच अोळखला पाहीजे. भारत सरकारने पुढील वर्षीच्या अंदाजपत्रकामध्ये दहशतवादविरोधी यंत्रणेसाठी मोठा हिस्सा राखून ठेवणे आवश्यक आहे.
मुंबईकरांची जिगर पुन्हा एकदा जगाला दिसेल. माझ्या आयुष्याची पहिली २२ वर्ष या नगरीतच गेली. ९३ च्या वेळची परीस्थिती मला आठवते आहे. पुन्हा एका दिवसात हे शहर आपल्या पायावर उभे राहील. रक्तपेढ्या पुन्हा एकदा भरतील. पण केवळ रग आहे म्हणून मुंबईकरांनी किती सहन करायचं? जिथे नुसतं जगणं हाच एक मोठा संघर्ष आहे त्या दुष्काळात हा दहशतवादाचा तेरावा महिना. मुंबईकरांना माझा पुन्हा एकदा सलाम!
ज्या लोकांनी काल प्राण गमावले - विशेषत: श्री. हेमंत करकरे (प्रमुख, दहशतवाद विरोधी पथक) - त्यांना माझी श्रद्धांजली.
An Oscar for Globalization!
१६ वर्षांपूर्वी

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा